Sunday 30 September 2018

कार्य-कर्ता...??

कार्य-कर्ता...??

रवाच वाचण्यात आलं की एक बेस्ट (BEST) वाल्या ड्राइव्हर आणि कंडक्टरला कोण्या एका पार्टीच्या रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला म्हणे... गर्दीच्यारस्त्यात बस रिक्षाला घासून नेली असा रिक्षाचालकाचा त्या बिचाऱ्या वयस्कर बसचालकावरचा आरोप...!

भर रस्त्यात त्या बसचालकावर अर्वाच्य शिव्यांचा पाऊस पाडून रिक्षाचालक थांबला नाही तर चक्क "मी अमुक-अमुक पार्टीचा सामाजिक कार्यकर्ता आहे, थांब आता तुला दाखवतोच मी काय चीज आहे ते." असं म्हणत त्याने थेट त्याच्या पार्टीच्या काही कार्यकर्त्यांना बोलावून ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांनाही बेदम चोप दिला. त्यात त्या बिचाऱ्या कंडक्टरची काय चूक होती म्हणा! असो...

मूळात विषय मार देण्याचा नव्हे तर 'मार देण्याचा' आहे!! प्रश्नच पडतो की ही इतकी हिम्मत येते तरी कुठून ..? सार्वजनिक वाहतूक सेवेच्या कर्मचाऱ्यांना भर रस्त्यात बस थांबवुन चोप दिला जातो. हे इतकं सहज-सोपं आहे का...?
सहच-सोपं आहे कारण तुम्ही विशिष्ट पार्टीचे 'कार्य-कर्ते' (?) आहात म्हणून की काय ??

खरं पाहता या सगळ्याची सुरुवात दुसरीकडूनच होते. त्याचं काय आहे ना, आज काल भुकांचे प्रकार खूप वाढलेयत. होय! भूक. पोटाला लागते ती भूक नव्हे, ती भूक तर हल्ली नाहीशीच झालेय. उपाशी कोण झोपतोय आज काल!

इथे भुका वाढल्यात त्या सत्तेच्या, वासनेच्या आणि सगळंच आपलसं करून घेण्याच्या! बाकी भूकांबद्दल बोलू केव्हातरी मात्र आजकाल जी सर्वाधिक वाढत चाललेली भूक म्हणजे 'सत्ता'.

ज्याला-त्याला सत्ता हवेय. ज्याला-त्याला मी म्हणेन तेच होईल असं वाटतंय. आणि सत्तेच्या या हव्यासापोटी नतद्रष्ट लोकांना हाताशी धरून कामं करवून घेणाच्या या टोळकीला आजकाल 'कार्यकर्ता' असं म्हंटल जातं. होय!, शब्द जरा कडू असतील पण ही वस्तुस्थिती आहे!

ही सत्ता मिळवण्यासाठी वेळोवेळी 'जत्रा' भरवल्या जातात, तेच ते मोठ्ठाले बॅनर्स, मोठं-मोठी आश्वासनं, पोकळ सभा, समाजाशी हातापाया पडणं, मोफत वास्तूवाटप, आजकाल तर काय 'पाळवापळवीत' पण मदत करणार म्हणे...!! असो, बरं आता इतकी कामं करायची झाली तर मग गोतावळा पण जमा करावा लागतो. मग तो कसा जमा करणार आणि त्यात कोण सामील होणार याचा शोध घेतला जातो. गल्ली-नुक्कडवर शोध सुरू होतो. मग ५६ इंटरव्ह्यू देऊनही वेळेने समृद्ध असलेली, अर्थात बुध्दीशी कसलाही संबंध नसला तरी चालेल, म्हणूनच वेळेने समृद्ध अशी पावले मोर्चेबांधणीकडे वळली जातात.

अपेक्षा जास्त नाही, ऐरवी मुलगी बघायला जाताना हुंड्यामध्ये काय-काय घेणार याची यादीच तयार असते! पण इथे एकच अपेक्षा, कमी वेळात पैसा, चारचौघात 'वट' (वर्चस्व) आणि 'सामाजिक कार्यकर्ता'
हा 'टॅग' की बस्स..., पठया खुश!!

भल्या-भल्यांना असं बळ येतं की जणू इतिहासच घडवणार की काय...इतरवेळी समाजात कोण्या मुलीच्या अब्रूचे लचके तोडले जात असताना हे लोक अगदी दुसऱ्याच्या हद्दीत फिरकणाऱ्या कुत्र्यासारखे शेपूट आत घालून गप्प बसतात. न जाणे तेव्हा हेच बळ कुठे गेलेलं असतं! 

हीच मंडळी होळी-दिवाळीच्या दिवशी विविध रंगांची उधळण करणार  मात्र एक विशिष्ट असा कोणता रंग म्हंटलत तर चक्क इंद्रधनुष्याला बरबटवून त्यात आपापल्या पार्टीचे रंग शोधणार. अर्थात सगळं कशासाठी तर साहेबाची छोटीशी थाप, वट वैगेरे तर आलीच त्या सोबत. ध्येय एकच, आपापल्या पार्टीच्या साहेबाला फेमस करणं, बाकी 'जत्रेकरू' सांभाळतीलच आपलं-आपलं (...आदल्या दिवशी 'मिठाईच्या पुड्या' पोहोचल्यावर).

अर्थात सगळं कसं एकदम फास्ट सुरू आहे की समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर वाच्यता करायला कुणाकडेच वेळ नाहीये. जो-तो मिळेल ते लुटत फरपटत चालला आहे! असतीलही काही प्रामाणिक समाजप्रेमी मात्र सत्तासंपादनाच्या या पुरात कोलमडले वृक्षच जणू ते!

हा मात्र आता कामं ही जोरदार सुरू आहेतच, जस त्या चोप देणाऱ्या  कार्य-कर्त्यांना पोलिसांनी अटक केली खरी, पण भीती कशाची??
साहेब आहेच की सोडवायला!!!

समाप्त

आभाळसांज

-मंगेश मिलिंद हरवंदे

Saturday 29 September 2018

आठवणीतलं फूल!


आठवणीतलं फूल!


कॉलेजचे दिवस असतातच सोनेरी म्हणण्यासारखे पण त्याची जाणीव कॉलेज संपल्यांनंतर होते. 

सिनियर कॉलेज म्हणजे कधी कळत तर कधी नकळत प्रेम तर आलंच!! कॉलेजला जाऊन पठ्या प्रेमात नाही पडला तर पठ्याच कसला तो..!! जणू काही प्रेमात नपडण्याला काही ऑपशनच नसतो. अर्थात साधारणपणे संपूर्ण आयुष्यातली ७० ते ७५% 'हिरवळ' ही, कॉलेजच्या दिवसांमध्येच आणि अगदी सगळ्याच ऋतूनमध्ये सभोवताल असते. सो, इतक्या हिरवळीतलं एखादं 'फुल' आपल्या मनातल्या गार्डनमध्ये नक्कीच घर करतं!! हा,आता त्या फुलांचे  वेग-वेगळे प्रकार आणि त्या-त्या प्रकारावरून त्यांच्या वेग-वेगळ्या व्याख्यापण पडतात असो त्या व्याख्यांवर आपण न बोललेलंच बरं!!

इथे तुमची प्रेयसी कितीही चांगली, कितीही सोज्वळ असली तरी आपले मित्र तिचा उल्लेख 'आयटम' असाच करणार, त्यात ती चुकून तुमच्या ग्रुपच्या समोरून जात असेल तर विचारायलाच नको! इतरवेळी तुमची आठवण न काढणारे मित्रपण तुम्ही समोर असतानासुद्धा मोठ्यांदा हाक मारणार "..... काय बरा आहेस ना..?" आणि आपली नजर तिच्याकडे...

कधी-कधी ती कॅन्टीनमध्ये असेल तर बर्थडे नसतानासुद्धा तुमचा बर्थडे महिन्यातून किमान दोनदा सेलिब्रेट केला जातो. तिलासुद्धा प्रश्न पडत असावा हा जन्माला तरी कितींदा आला... 

बरं पहिलं-वहिलं प्रेम असल्याने तिच्याशी बोलण्याची आणि योगा-योगाने भेट झाली हे भासवण्याची प्रत्येकाची वेग-वेगळी स्टाईल असते. त्यात तुम्ही आणि ती जर का वेग-वेगळ्या फिल्डचे स्टुडंट असाल तर मात्र जरा जास्तच धावपळ करावी लागते. कारण तिचं लेक्चर, तिचे सब्जेक्टस आणि क्लासेसही वेग-वेगळे असतात सो, योगा-योग जुळवून आणण्याचं काम थोडं कठीण होऊन जातं! मात्र ती तुमच्याच फिल्डची असल्यास अर्धेप्रयत्नतर तिथेच संपतात. एक्साम्स जवळ आल्यावर आपल्याकडे नोट्स असतानासुद्धा मुद्दाम तिच्याकडे नोट्स मागण्याचे निर्धार मनात येतात मात्र ती प्रत्यक्षात समोर आल्यावर आपली फूस्स्स$$$ झालेली असते. 

शांततेची सवय नसतानापण फक्त ती आहे म्हणून लायब्ररीत कसलंतरी पुस्तक चाललं जातं. मग बऱ्याच वेळा ते पुस्तकपण नेमकं उलटं पकडलेलं असतं! ते पाहून तिची मैत्रीण मात्र आपण अनपढ असल्यासारखी आपल्याकडे बघते...काही वेळा तर अगदी लेक्चर सुरु होता-होताच क्लासच्या खिडकीतून ती कुठेतरी लांब दिसते म्हणून तिला पाहण्यासाठी लेक्चर हॉलच्या मागच्या डोअरने पळण्याचा प्रयत्न केला जातो. इतक्यात लेक्चरर समोर उभा ठाकतो!! आणि लेक्चरला येऊनसुद्धा पळून जाताना पाहून रागाने ID कार्ड जप्त करतो. मग त्याच्याशी कसातरी समझोता करत ID कार्ड परत मिळवलं जातं. इतकं सगळं झाल्यावरही बाहेर आल्यावर मात्र ती तिथून गायब झालेली असते. 

दिवस वाऱ्यासारखे भुर्रकन उडून जात असतात एक्सामपण लागते. एक्सामच्यावेळीसुद्धा स्वतःपेक्षा तिचा क्लास नंबर आवर्जून पहिला जातो. अगदी Answer paper वाटत असतानापण तिच्या क्लास जवळून फेरफटका मारला जातो...कदाचित काहीतरी विसरून ती बाहेर येईल आणि तिला पाहता येईल हा ओव्हरकॉन्फिडेन्स मनात असतो. आणि यासाऱ्या गडबडीत स्वतःच ID कार्ड कुठेतरी हरवलेलं असतं...आणि एक्सामिनर पुन्हा एकदा क्लास बाहेर काढतो. मात्र चेहऱ्यावर तेच ते नेहमीचं स्मितहास्य असतं. कारण प्रेम हे सच असतं !!!
 





समाप्त 

आभाळसांज 

-मंगेश हरवंदे    











Monday 17 September 2018

हॉल्ट स्टेशन: [Part 3]


पृथ्वीवर अचानक ढग गडगडून विजा जशा चमकतात आणि अधून-मधून लक्ख प्रकाश जसा पडतो तसा लख्ख प्रकाश दूरपर्यंत गेलेल्या त्यापायऱ्या-पायर्यांच्या रस्त्यावर पडत होता. त्याच रस्त्यावरनं अचानक मंद-मंद प्रकाशातून एक विक्राळ प्राणी मोठ्या आवेगाने दौडताना उदयनेे पाहिला. उदयला आता इतकीशीहि भीती उरली नव्हती. ते म्हणतात ना 'मेलेलं कोंबडं आगीला भित नसतं...' तशीच काहीशी अवस्था उदयची झाली होती. पाहता-पाहता तो विक्राळ प्राणी म्हणजे एक अवाढव्य रेडा आणि त्यावर बसून येणारा तो 'यम' उदयने उभ्या आयुष्यत, आतापर्यंत पहिला नव्हता. उष्ण-वर्ण, तापट भाव, तीक्ष्ण नजर आणि सभोवताल भस्मसात होईल की काय असं तेज एका विशाल रेड्यावर बसून वेगाने उदयच्या दिशेने पळत होतं.

समोरा-समोर झाल्यावर नक्की नमसकार करावा कि इतरवेळी मीटिंगला शेकहॅण्ड करतात तसं औपचारिक स्मितहास्य करावं हे उदयला समजत नव्हतं. शेवटी निर्विकार होऊन पुढच्या प्रक्रियेची वाट पाहावं असं उदयने ठरवलं..!!

'चित्रगुप्ताने' यमाकडे आदराने पाहून 'महाराज' असं म्हणून वंदन केलं. उदयसाठी हे सगळं कसं एक मूव्ही सारखं चाललं होतं. मुळातच ४० वर्ष TV, मूव्ही याची आवड बाळगून मेल्यानंतरपण १४-१५ वर्ष प्रत्यक्ष मूव्हीमध्येच काम करण्यासारखं वातावरण झेलल्या नंतर नकळतच उदय हे सगळं एका नव्याच curiosity ने पाहत होता आणि एकंदरीत हे सगळं कोण्या फिल्म डायरेक्टर ने डायरेक्ट केलं नसून चक्क प्रत्यक्षात आहे याच नवल उदयला वाटत असावं...!

पुढे 'चित्रगुप्ताने' उदयच्या कर्माची कहाणी वाचण्यास सुरुवात केली, अगदी त्याच्या उदयपूर्वीच्या जन्मापासनं, त्यांच्यानुसार उदय हा मागच्या जन्मी एका गायीचं वासरू असून कुठल्यातरी मंदिराबाहेर लोक त्याला चारा घालत असत वैगेरे- वैगेरे...
यानंतर तो मनुष्य जन्मात येऊन उदय बनला, त्याचा जन्म, बालपण या सगळ्या कहाण्यांना सुरुवात झाली. चित्रगुप्त उदयच्या अख्या आयुष्याचा पाढा वाचत होते तसा उदय त्याच्या त्या-त्या आठवणीत जाऊन त्या आठवणींचा अनुभव घेत होता. त्याच्या शाळेतल्या गोष्टी>> आठवीत पास होऊन नववीत गेल्याचा आनंद...ते वाटलेले पेढे... कॉलेजचा पहिला दिवस... मृण्मयीपूर्वींची लफडी... मृण्मयीची भेट लग्न आणि मृत्यू दरम्यान केलेली सगळी कर्म...अगदी सरकारी खात्यात लागलेली नोकरी आणि घेतलेली पहिली लाच वैगेरे- वैगेरे
सर्व पडताळणी अंती निर्णय घेण्याची वेळ येताच उदयची उत्कंठता शिगेला पोहोचली कारण अंतिम निर्णय हा 'यम' देणार होते.

...आणि यमाचा आवाज- "उदया तुझा एकंदरीत जीवनप्रवास पाहता तू फारशी कारस्थानं रचली नसलीस तरी कोणाचं उदारहाताने स्वागतही केलेलं नाहीयेस, दान-धर्म करताना देखील तुझ्या मनात त्यातून मिळणारं समाधान यावरच तुझं मन केंद्रित केलस. मुद्दामहून कोणाला दुखावलं नसलस तरी स्वतःच्या पदाचा वापर करून लाच घेण्यासारखी स्वार्थी कामं केलीस. सतत धन आणि उच्चपदामागे राहून ते सगळं मिळवलंस खरं पण त्यासाठी खास कष्ट केले नाहीस, स्वतःअशी काही अंगमेहनत तू कधीच केली नाहीस....
तर या सारांशावरून,चित्रगुप्ता काय जन्म ठरतात याचे..?"


अंतिम निर्णयाच्या आतुरतेने टवकारले उदयचे कान यमाचे शब्द-नि-शब्द अगदी बारकाईने टिपत होते. उदयला खोलवर कुठेतरी आनंदही होत होता कि आपण जे मिळवायचं होतं ते मिळवलच, पण  त्यासाठी कोणाला फारसं काही दुखावलं नसून दान-धर्म पण केली आहेत मग ती भले फळाची अपेक्षा बाळगून केलेली असेनात की...!! अगदी मेलेला माणूससुद्धा किती Optimist असू शकतो याचं मेल्यांनतरच जिवंत उदाहरण म्हणजे उदयच होता..!!

यमाच्या प्रश्नावर खोल विचार करून चित्रगुप्ताने दोन जन्म सुचविले >> 'गर्दभ किंवा पिपीलिका'
उदयला हे दोन नक्की काय आहेत हे लक्षात आल्याने -राहून त्याने विचारणा केली>> "व्हाट्स धिस पिपीलिका अँड गर्दभ??"

यावर 'गाढव' किंवा 'मुंगी' यापैकी एका जन्मात आपण जाणार याच उदयला न्यात झालं.

यमाचा आवाज>> "एकंदरीत उदयने केलेल्या कर्मांवरून त्याच्या बुद्धी विषयीची शंका माझ्या मनात नाही, त्यामुळे या दोन्ही जन्मात त्याला कष्ट आणि धावपळ करावीच लागणार असून 'पिपीलिका' हा उदयचा पुढचा जन्म असेल हे मी जाहीर करतो." असं म्हणून यमाची पाठमोरी आकृती उदयला दिसली.


सो, फायनली उदय मुंगीच्या जन्मात जाणार होता आणि त्या प्रक्रियेला सुरुवात होणार होती. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणजे पूर्वीच्या जन्माची आणि 'होल्टस्टेशन' वरील स्मुर्ती नाहीशा करणे. सो, स्मुर्ती नाहीशी करण्याची प्रक्रिया चालू असतानाच, तो प्रवेशद्वार जिथनं उदयने आत प्रवेश केला होता त्या प्रवेशद्वाराशी काहीतरी गदारोळ चाललाय अशी खबर चित्रगुप्ताकडे आली. तस समजताच चित्रगुप्त नक्की कसला गदारोळ आणि तो थांबवण्यासाठी त्या दिशेने निघून गेले. ते परतल्याननंतर उदयला समजलं कि कोणीतरी एक मोठा नेता तिथे आला असून (मृत्यूनंतर) तो अजूनसुद्धां इलेक्शनचा प्रचार करत होता. उदयला त्या नेत्याच्या Optimistपणाची कीव वाटत होती...

सो, सर्व प्रक्रिया पूर्णझाल्यावर आता उदय 'मुंगी' या त्याच्या नवीन जन्मात जाण्यास सज्य होता. अर्थात सद्यस्तिथीत तो बेशुद्ध अवस्थेत होता मात्र लवकरच त्याचा जन्म थेट मुंगीच्या घरात म्हणजेच कोणत्यातरी वारुळात होणार होता...!!


समाप्त

आभाळसांज


-मंगेश मिलिंद हरवंदे

Also Read "देव तारी त्याला कोण..?"


Saturday 16 June 2018

हॉल्ट स्टेशन:

हॉल्टस्टेशन: 


"... मृण्मयी, जरा सोफ्यावरचं वॉलेट आणि कार किज् खाली घेऊन येनं लवकर!" इतकंच बोलून उदयने फोन कट केला आणि बिल्डिंगच्या खाली मृण्मयीची वाट पाहू लागला. ३-४ मिनिटातच मृण्मयी पीठाने भरलेल्या हातात वॉलेट आणि कार कीज् घेऊन खाली आली. "...अजून काय साहेब.?" असं खोचक आवाजात विचारत तिने वॉलेट आणि कार कीज् उदयला दिल्या. "...नाही, फक्त हेच राहीलं होतं! चल बाय सी यू बडी!!"
"थांब, हा घे रुमाल; हा पण विसरला होतास."  " ओह्ह थँक्स, चल निघतो!!" असं म्हणत उदयने निरोप घेतला.

खरं तर हे सगळं मृण्मयीला काही नवीन नव्हतं, आठवड्यातून ४ दिवसतरी उदय काहींना काही विसरत असे, आणि मृण्मयीला हातचं काम सोडून खाली जावं लागे. या सगळ्याची मृण्मयीला आता सवयही झाली होती.

उदय एक चाळिशीतला हुशार आणि विचारवंत, पण स्वभावाने खूप आळशी होता. गेली १८-२० वर्ष सरकारी सार्वजनिक बांधकामखात्यात एका मोठ्या हुद्यावर कार्यरत होता. अर्थात त्याच्या लठ्ठपणाचं आणि आळशी स्वभावाच हेच एक कारण असावं!! हा:हा:हा:...

मृण्मयी उदयची पत्नी, महिलामंडळाची अध्यक्ष आणि एक कुशल गृहिणी होती. दोघांची पहिली भेट कॉलेज  पार्किंगमध्ये झाली होती आणि त्या भेटीचं रूपांतर चारच वर्षात शुभमंगल सावधान मध्ये झालं. अर्थातच त्यांचं love-marriage होतं. आज १४-१५ वर्ष झाली पण दोघेही पैसा आणि पोसिशनमागे पळणारे असल्याने कुटुंब वाढवण्यात त्यांना फारसा रस नव्हता. किंबहुना दोघेही स्वावलंबी आणि फास्ट लाईफ जगणारे...

मृण्मयीचा अधिकसावेळ महिलामंडळाच्या मिटींग्समध्ये तर साहेबांचा बहुतेकसा वेळ ऑफिस आणि नवं-नवीन पदार्थ खाण्यात जायचा. उदय उत्तम खव्वय्या होता, आणि त्यातूनच वेळ उरला तर TV आहेच.! तासंतास TV  पाहणे हा त्याचा छंदच जणू... दोघांचंही आयुष्य कसं  खुशल-मंगल चाललं होतं. माणूस ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर धावाधाव करतो ती गोष्ट साधारणपणे वयाच्या ४०-४५ पर्यंत मिळवतोच. साधारणतः तसेच पोसिशन आणि आर्थिक सुबत्ता दोघांनीही मिळवल्या होत्या. आता त्या फक्त टिकवणं आणि एखादा रिटायरमेंटचा मस्त प्लॅन करणं इथपर्यंत वाटचाल आली होती.

... पण बहुतेक सृष्टीला काही हे मानवलेलं नव्हतं. अर्थात सृष्टीच्या मनात काय चालतं हे कोण जाणे!! - म्हणे सगळं विधीलिखित आहे.

एका तीव्र-अतितीव्र  हृदयविकाराच्या झटक्याने उदयच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीला पूर्णविराम दिला होता. उदयच्या डेडबॉडीकडे पाहताना मृण्मयीचे डोळे पाणावले होते, चेहरा निस्तेज होऊन कसल्यातरी गहन विचारात गेल्यासारखी एकटक ती त्याच्या डेडबॉडीकडे पाहत होती.  कदाचित फास्ट पळत आलेली लाईफ आणि एकमेकांना पुरेसा न दिलेला वेळ तिला जुन्या आठवणीत घेऊन गेला असावा...

 मघाशीच म्हंटल्याप्रमाणे सृष्टीचं मन आणि विधीचं विधान यांची विसंगती कोणालाच उलगडलेली नाही. उदय तरी त्याला अपवाद कसा असणार...!!!

डोळे उघडताच उदयला आपण कोणत्यातरी भयंकर लांब रांगेत असल्याचा साक्षात्कार झाला. मंद प्रकाश - धूसर वातावरण, दूर-दूर पसरलेली धुक्यांची वादळं, कसल्यातरी भयाण वास्तूत असलेली अस्वस्थता आणि त्यातूनच कुठूनतरी लांबून एका भव्यशा घंटेचा परावर्तित होणार आवाज उदयचे कान बधिर करणारा होता. आणि उदय ज्या रांगेत उभा होता ती रांग वळणं-वळणं घेत कुठल्या तरी प्रचंड भव्य वास्तूमध्ये जात असल्याचं चित्र उदय पहात होता.

उदयने पाहिलं, रांगेत असणाऱ्या माणसांची reaction अगदी त्याच्या सारखीच प्रश्नार्थक होती पण जणू कोणी एकमेकांशी काहीच विचारणा न करताच रांगेत पुढे पुढे सरकत होते. उदय ला काही सुचत नव्हतं काय चाललं असावं हे..?  त्याने मृण्मयीला हाक मारल्या सारखं केलं, आठवण्याचा प्रयत्न केला कि, कदाचित जास्त वेळ  TV पहातो म्हणून मृण्मयीनेच तर कुठल्या हॉरर मूवी- शो मध्ये त्याला आणलंतर  नाही ना ...? त्याने हजारदा मनात निश्चय केला कि, मृण्मयी मी TV जास्त वेळ नाही पाहणार पण या हॉरर- शो मधनं मधनं निघून जाऊ आपण...!

खूप आठवण्याचा प्रयत्न केला कि, मृण्मयीने आपल्याला नक्की आणलं तरी कधी..? काहीच का नाही आठवत आपल्याला आणि ती आहे तरी कुठे...? आठवून-आठवून त्याला मृण्मयीने वोलेट आणि कार कीज्  खाली आणूनदेण्याइतकच आठवत होतं आणि मग ऑफिस मध्ये जाऊन भरपेट केलेला लंच आणि त्यानंतरची साईटव्हिझीट ची मीटिंग त्याला आठवली. इतक्यातच उदयला रांगेची सांगता झालेली असून एका विशाल प्रवेशद्वारापलीकडे एक भव्य घंटा असल्याचं त्याने पाहिलं. मघशीपासून सतत परावर्तित होणाऱ्या त्या घणाघाती घंटेच्या आवाजाचा उलगडा उदयला झाला. " I HOPE, या सगळ्याचा उलगडा पण लवकरच होईल." असं म्हणत त्याने प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला.

आत प्रवेश करताच उदयचे पाय थर-थर कापू  लागले कारण आतील सारंच काही अधांतरी होतं. सगळंकसं हवेवर तरंगणारं, मधूनच कुठूनतरी येणारी हवेची झुळूक उदयच्या कानात वादळासारखा आवाज करणारीशी  भासत होती.  काजव्यांसारखी किंबहुना त्याही पेक्षा तेजस्वी चमकणारी चतुर पाखरं सर्वत्र घिरट्या घालत होती. आकाशातले सर्व तारे अगदी लक्ख चमकत होते. वातावरण काहीसं प्रसन्न मात्र पूर्ण प्रश्नार्थक होतं.

इतक्यात एक भारदस्त आवाज झाला, "पुढे हो उदया ओळ अनंत आहे" मघापासूनची घंटानादाने उदयच्या कानाला आलेली बधिरता एका क्षणात उडून तीचं भयभीततेत रूपांतर झालं...!! "ओह, हा जर का कुठला मृण्मयीचा हॉरर-शो वैगेरे असला तर मात्र मी तिची चांगलीच शाळा घेईन आणि तिला सांगेन कि मला नाही आवडत असा फाजीलपणा...!!" इतक्यात दुसऱ्यांदा आवाज झाला, " उदया मी एकदाच बोलतो, पुढे येऊन या कटघरात  उभा रहा, तुझ्या सर्व शंकांचं निरसन क्षणात दूर होईल." उदयनं थोडं धीरानं घेत उंचावर असलेल्या कटघराकडे आपली पाऊले वळवली. मोठी हिम्मत करून त्याने प्रश्न केला,

 " हे सगळं नक्की आहे तरी काय आणि आपण कोण..? आणि कुठनं बोलताय ? मृण्मयी कुठयं ?.." क्षणभराचाही विलंब न लावता, एक विलक्षण अशी व्यक्ती तिच्या भारदस्त स्वरात प्रकटली आणि म्हंटली,

 " मी 'चित्रगुप्त' तुझ्या सगळ्या शंकांचं निरसन करण्यास सांगतो कि, एका हृदयविकाराच्या झटक्याने तुला जीवनप्रवास संपला असून तू आता तुझ्या जगापासून आणि मृण्मयीपासून दूर आला आहेस, इथे तुझ्या जीवनातल्या सर्व कर्माची पडताळणीकरून तुझी अंतिम शिक्षा ठरवण्यात येईल. तुझ्या सर्व कर्मांची लिखिते आपल्याकडे संग्रहित आहेत. तू हे सत्य पचवलंस कि आपण आपल्या कामकाजाला सुरुवात करू..."

उदयच्या कानावर पडणारे किंबहुना कानात घुसणारे ते तीव्र स्वर ऐकून उदय भंडावून गेला होता, नक्की कसं व्यक्त व्हावं हे त्याला समजतच नव्हतं. अर्थात सगळ्यांचीच स्थिती हि अशीच होत असेल, कदाचित म्हणूनच तर 'चित्रगुप्ताने' उदयला हे सत्य पचवण्यासाठी थोडा वेळ दिला असावा ...!!

 उदयला त्याच्या लहानपणी पाहिलेल्या 'रामानंदसागर' यांच्या मालिकांची आठवण होऊ लागली. उदयला तर विश्वासच बसत नव्हता कि तो अस्थित्वातच नाही याचा. त्याने स्वतःला एक जोराचा चिमटा काढला... कदाचित मृण्मयीचा हॉरर-शो किव्वा एखादं स्वप्नतर नाहीना हे...!!

सर्वपडताळण्यांनंतर उदयच्या मानाने मान्य केलं कि, हे एक वेगळं जग असून त्याची मृण्मयी त्याच्या सोबत नाही. त्याचा खरोखरच मृत्यू झाला असून तो त्याच्या सर्व कर्मांची शिक्षा वैगेरे-वैगेरे....!!

सभोवतालचं सगळं वातावरण पचवून उदयने प्रश्न केला, "...मग माझ्या मृण्मयीच काय? कसं होणार तिचं, एकट्याने कशी जगणार ती? माझी सवय आहे तिला."


यावर आवाज झाला, " उदया सवयीनांपण कालांतरं असतात, काहीकाळ तिला तुझी सवय होती पण अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीची ती तरी किती सवय ठेवणार. तूला मरून १४ वर्ष उलटलीयेत. आठवतंय ? मी म्हंटलं होत पुढे हो ओळ अनंत आहे म्हणून..."

उदय खूप अचंबित होत होता, त्याच्या मरणाला १४ वर्ष झालेयत यावर तर त्याला विश्वासच बसत नव्हता. तो उभा असलेली माघाशीची वाटणारी रांग १४ वर्षांपासून चालत आलेय आणि त्यारांगेत असणार सगळी माणसंही उदय सारखीच मृत असून त्या माणसांना अजून यासर्वाची कल्पनापण नाही!! उदयच्या डोक्यात विचारांची वादळं वाहत होती. उदयचं  जग हे एकाच दिवसात त्याच्यापासून १४ वर्षांनी लांब गेलं होतं आणि थक्क होऊन तो त्याकडे पाहत होता.

" होय, उदया हेच सत्य आहे! आणि हे सत्य एक ना एक दिवस सगळ्यांनाच पचवावं लागत, आणि हीच ती जागा, हेच ते तुमच्या भाषेतलं "हॉल्ट स्टेशन" जिथे तुम्हाला तुमच्या सर्व कर्मांची पडताळणी करून तुम्हाला स्वर्गात पाठवायचं अथवा नर्कलोकात पाठवायचं हे ठरवण्यात येतं." ...आकाशवाणी होतच होती..

एकंदरीतच्या सगळ्या स्पष्टीकरणातून उदय थोडा शांत झाला होता मात्र मृण्मयीची काळजी त्याला अस्वस्थ करत होती, ती व्यक्त केल्यानंतर त्याला साक्षात्कार झाला कि, सुरुवातीला मृण्मयी कोलमडून गेली होती पण तिने स्वतःला सावरत महिला मंडळातून निवृत्ती घेऊन आपली 'टूर अँड ट्रॅव्हल्स' ची कंपनी सुरु केली असून तिने उदय शिवाय किंबहुना उदयच्या सवयिंशिवाय जगायला शिकली होती, हे जाणून उदयला खूप मनशांती मिळाली.

थोड्याच वेळात उदयच्या कर्मपडताळणीला सुरुवात होणार होती, आयुष्यभर चित्रपट आणि पुस्तकांमध्ये पाहिला-वाचलेल्या यमाचा समक्ष-साक्षात्कार उदयला थोड्याच वेळात होणार होता. एव्हाना उदयलाही  या वातावरणाची सवय झालीच होती.

पृथ्वीवर अचानक ढग गडगडून विजा जशा चमकतात आणि अधून-मधून लक्ख प्रकाश जसा पडतो तसा लख्ख प्रकाश दूरपर्यंत गेलेल्या त्यापायऱ्या-पायर्यांच्या रस्त्यावर पडत होतात्याच रस्त्यावरनं अचानक मंद-मंद प्रकाशातून एक विक्राळ प्राणी मोठ्या आवेगाने दौडताना उदयनेे पाहिलाउदयला आता इतकीशीहि भीती उरली नव्हतीते म्हणतात ना 'मेलेलं कोंबडं आगीला भित नसतं...' तशीच काहीशी अवस्था उदयची झाली होतीपाहता-पाहता तो विक्राळ प्राणी म्हणजे एक अवाढव्य रेडा आणि त्यावर बसून येणारा तो 'यमउदयने उभ्या आयुष्यत आतापर्यंत पहिला नव्हताउष्ण-वर्णतापट भावतीक्ष्ण नजर आणि सभोवताल भस्मसात होईल की काय असं तेज एका विशाल रेड्यावर बसून वेगाने उदयच्या दिशेने पळत होतं.

समोरा-समोर झाल्यावर नक्की नमसकार करावा कि इतरवेळी मीटिंगला शेकहॅण्ड करतात तसं औपचारिक स्मितहास्य करावं हे उदयला समजत नव्हतंशेवटी निर्विकार होऊन पुढच्या प्रक्रियेची वाट पाहावं असं उदयने ठरवलं..!!

'चित्रगुप्तानेयमाकडे आदराने पाहून 'महाराजअसं म्हणून वंदन केलंउदयसाठी हे सगळं कसं एक मूव्ही सारखं चाललं होतंमुळातच ४० वर्ष TV, मूव्ही याची आवड बाळगून मेल्यानंतरपण १४-१५ वर्ष प्रत्यक्ष मूव्हीमध्येच काम करण्यासारखं वातावरण झेलल्या नंतर नकळतच उदय हे सगळं एका नव्याच curiosity ने पाहत होता आणि एकंदरीत हे सगळं कोण्या फिल्म डायरेक्टर ने डायरेक्ट केलं नसून चक्क प्रत्यक्षात आहे याच नवल उदयला वाटत असावं...!

पुढे 'चित्रगुप्तानेउदयच्या कर्माची कहाणी वाचण्यास सुरुवात केलीअगदी त्याच्या उदयपूर्वीच्या जन्मापासनंत्यांच्यानुसार उदय हा मागच्या जन्मी एका गायीचं वासरू असून कुठल्यातरी मंदिराबाहेर लोक त्याला चारा घालत असत वैगेरेवैगेरे...
यानंतर तो मनुष्य जन्मात येऊन उदय बनलात्याचा जन्मबालपण या सगळ्या कहाण्यांना सुरुवात झालीचित्रगुप्त उदयच्या अख्या आयुष्याचा पाढा वाचत होते तसा उदय त्याच्या त्या-त्या आठवणीत जाऊन त्या आठवणींचा अनुभव घेत होतात्याच्या शाळेतल्या गोष्टी>> आठवीत पास होऊन नववीत गेल्याचा आनंद...ते वाटलेले पेढे... कॉलेजचा पहिला दिवस... मृण्मयीपूर्वींची लफडी... मृण्मयीची भेट लग्न आणि मृत्यू दरम्यान केलेली सगळी कर्म...अगदी सरकारी खात्यात लागलेली नोकरी आणि घेतलेली पहिली लाच वैगेरेवैगेरे
सर्व पडताळणी अंती निर्णय घेण्याची वेळ येताच उदयची उत्कंठता शिगेला पोहोचली कारण अंतिम निर्णय हा 'यमदेणार होते.

...आणि यमाचा आवाज- "उदया तुझा एकंदरीत जीवनप्रवास पाहता तू फारशी कारस्थानं रचली नसलीस तरी कोणाचं उदारहाताने स्वागतही केलेलं नाहीयेसदान-धर्म करताना देखील तुझ्या मनात त्यातून मिळणारं समाधान यावरच तुझं मन केंद्रित केलसमुद्दामहून कोणाला दुखावलं नसलस तरी स्वतःच्या पदाचा वापर करून लाच घेण्यासारखी स्वार्थी कामं केलीससतत धन आणि उच्चपदामागे राहून ते सगळं मिळवलंस खरं पण त्यासाठी खास कष्ट केले नाहीसस्वतःअशी काही अंगमेहनत तू कधीच केली नाहीस....
तर या सारांशावरून,चित्रगुप्ता काय जन्म ठरतात याचे..?"


अंतिम निर्णयाच्या आतुरतेने टवकारले उदयचे कान यमाचे शब्द-नि-शब्द अगदी बारकाईने टिपत होतेउदयला खोलवर कुठेतरी आनंदही होत होता कि आपण जे मिळवायचं होतं ते मिळवलचपण  त्यासाठी कोणाला फारसं काही दुखावलं नसून दान-धर्म पण केली आहेत मग ती भले फळाची अपेक्षा बाळगून केलेली असेनात की...!! अगदी मेलेला माणूससुद्धा किती Optimist असू शकतो याचं मेल्यांनतरच जिवंत उदाहरण म्हणजे उदयच होता..!!

यमाच्या प्रश्नावर खोल विचार करून चित्रगुप्ताने दोन जन्म सुचविले >> 'गर्दभ किंवा पिपीलिका'
उदयला हे दोन नक्की काय आहेत हे लक्षात  आल्याने -राहून त्याने विचारणा केली>> "व्हाट्स धिस पिपीलिका अँड गर्दभ??"

यावर 'गाढवकिंवा 'मुंगीयापैकी एका जन्मात आपण जाणार याच उदयला न्यात झालं.

यमाचा आवाज>> "एकंदरीत उदयने केलेल्या कर्मांवरून त्याच्या बुद्धी विषयीची शंका माझ्या मनात नाहीत्यामुळे या दोन्ही जन्मात त्याला कष्ट आणि धावपळ करावीच लागणार असून 'पिपीलिकाहा उदयचा पुढचा जन्म असेल हे मी जाहीर करतो." असं म्हणून यमाची पाठमोरी आकृती उदयला दिसली.


सोफायनली उदय मुंगीच्या जन्मात जाणार होता आणि त्या प्रक्रियेला सुरुवात होणार होतीया प्रक्रियेचाच एक भाग म्हणजे पूर्वीच्या जन्माची आणि 'होल्टस्टेशनवरील स्मुर्ती नाहीशा करणेसोस्मुर्ती नाहीशी करण्याची प्रक्रिया चालू असतानाचतो प्रवेशद्वार जिथनं उदयने आत प्रवेश केला होता त्या प्रवेशद्वाराशी काहीतरी गदारोळ चाललाय अशी खबर चित्रगुप्ताकडे आलीतस समजताच चित्रगुप्त नक्की कसला गदारोळ आणि तो थांबवण्यासाठी त्या दिशेने निघून गेलेते परतल्याननंतर उदयला समजलं कि कोणीतरी एक मोठा नेता तिथे आला असून (मृत्यूनंतरतो अजूनसुद्धां इलेक्शनचा प्रचार करत होताउदयला त्या नेत्याच्या Optimistपणाची कीव वाटत होती...

सोसर्व प्रक्रिया पूर्णझाल्यावर आता उदय 'मुंगीया त्याच्या नवीन जन्मात जाण्यास सज्य होताअर्थात सद्यस्तिथीत तो बेशुद्ध अवस्थेत होता मात्र लवकरच त्याचा जन्म थेट मुंगीच्या घरात म्हणजेच कोणत्यातरी वारुळात होणार होता...!!


समाप्त


 आभाळसांज 

- मंगेश मिलिंद हरवंदे 


सुटकेचा नि:स्वास अनुभवण्यास क्लिक करा.