Monday 17 September 2018

हॉल्ट स्टेशन: [Part 3]


पृथ्वीवर अचानक ढग गडगडून विजा जशा चमकतात आणि अधून-मधून लक्ख प्रकाश जसा पडतो तसा लख्ख प्रकाश दूरपर्यंत गेलेल्या त्यापायऱ्या-पायर्यांच्या रस्त्यावर पडत होता. त्याच रस्त्यावरनं अचानक मंद-मंद प्रकाशातून एक विक्राळ प्राणी मोठ्या आवेगाने दौडताना उदयनेे पाहिला. उदयला आता इतकीशीहि भीती उरली नव्हती. ते म्हणतात ना 'मेलेलं कोंबडं आगीला भित नसतं...' तशीच काहीशी अवस्था उदयची झाली होती. पाहता-पाहता तो विक्राळ प्राणी म्हणजे एक अवाढव्य रेडा आणि त्यावर बसून येणारा तो 'यम' उदयने उभ्या आयुष्यत, आतापर्यंत पहिला नव्हता. उष्ण-वर्ण, तापट भाव, तीक्ष्ण नजर आणि सभोवताल भस्मसात होईल की काय असं तेज एका विशाल रेड्यावर बसून वेगाने उदयच्या दिशेने पळत होतं.

समोरा-समोर झाल्यावर नक्की नमसकार करावा कि इतरवेळी मीटिंगला शेकहॅण्ड करतात तसं औपचारिक स्मितहास्य करावं हे उदयला समजत नव्हतं. शेवटी निर्विकार होऊन पुढच्या प्रक्रियेची वाट पाहावं असं उदयने ठरवलं..!!

'चित्रगुप्ताने' यमाकडे आदराने पाहून 'महाराज' असं म्हणून वंदन केलं. उदयसाठी हे सगळं कसं एक मूव्ही सारखं चाललं होतं. मुळातच ४० वर्ष TV, मूव्ही याची आवड बाळगून मेल्यानंतरपण १४-१५ वर्ष प्रत्यक्ष मूव्हीमध्येच काम करण्यासारखं वातावरण झेलल्या नंतर नकळतच उदय हे सगळं एका नव्याच curiosity ने पाहत होता आणि एकंदरीत हे सगळं कोण्या फिल्म डायरेक्टर ने डायरेक्ट केलं नसून चक्क प्रत्यक्षात आहे याच नवल उदयला वाटत असावं...!

पुढे 'चित्रगुप्ताने' उदयच्या कर्माची कहाणी वाचण्यास सुरुवात केली, अगदी त्याच्या उदयपूर्वीच्या जन्मापासनं, त्यांच्यानुसार उदय हा मागच्या जन्मी एका गायीचं वासरू असून कुठल्यातरी मंदिराबाहेर लोक त्याला चारा घालत असत वैगेरे- वैगेरे...
यानंतर तो मनुष्य जन्मात येऊन उदय बनला, त्याचा जन्म, बालपण या सगळ्या कहाण्यांना सुरुवात झाली. चित्रगुप्त उदयच्या अख्या आयुष्याचा पाढा वाचत होते तसा उदय त्याच्या त्या-त्या आठवणीत जाऊन त्या आठवणींचा अनुभव घेत होता. त्याच्या शाळेतल्या गोष्टी>> आठवीत पास होऊन नववीत गेल्याचा आनंद...ते वाटलेले पेढे... कॉलेजचा पहिला दिवस... मृण्मयीपूर्वींची लफडी... मृण्मयीची भेट लग्न आणि मृत्यू दरम्यान केलेली सगळी कर्म...अगदी सरकारी खात्यात लागलेली नोकरी आणि घेतलेली पहिली लाच वैगेरे- वैगेरे
सर्व पडताळणी अंती निर्णय घेण्याची वेळ येताच उदयची उत्कंठता शिगेला पोहोचली कारण अंतिम निर्णय हा 'यम' देणार होते.

...आणि यमाचा आवाज- "उदया तुझा एकंदरीत जीवनप्रवास पाहता तू फारशी कारस्थानं रचली नसलीस तरी कोणाचं उदारहाताने स्वागतही केलेलं नाहीयेस, दान-धर्म करताना देखील तुझ्या मनात त्यातून मिळणारं समाधान यावरच तुझं मन केंद्रित केलस. मुद्दामहून कोणाला दुखावलं नसलस तरी स्वतःच्या पदाचा वापर करून लाच घेण्यासारखी स्वार्थी कामं केलीस. सतत धन आणि उच्चपदामागे राहून ते सगळं मिळवलंस खरं पण त्यासाठी खास कष्ट केले नाहीस, स्वतःअशी काही अंगमेहनत तू कधीच केली नाहीस....
तर या सारांशावरून,चित्रगुप्ता काय जन्म ठरतात याचे..?"


अंतिम निर्णयाच्या आतुरतेने टवकारले उदयचे कान यमाचे शब्द-नि-शब्द अगदी बारकाईने टिपत होते. उदयला खोलवर कुठेतरी आनंदही होत होता कि आपण जे मिळवायचं होतं ते मिळवलच, पण  त्यासाठी कोणाला फारसं काही दुखावलं नसून दान-धर्म पण केली आहेत मग ती भले फळाची अपेक्षा बाळगून केलेली असेनात की...!! अगदी मेलेला माणूससुद्धा किती Optimist असू शकतो याचं मेल्यांनतरच जिवंत उदाहरण म्हणजे उदयच होता..!!

यमाच्या प्रश्नावर खोल विचार करून चित्रगुप्ताने दोन जन्म सुचविले >> 'गर्दभ किंवा पिपीलिका'
उदयला हे दोन नक्की काय आहेत हे लक्षात आल्याने -राहून त्याने विचारणा केली>> "व्हाट्स धिस पिपीलिका अँड गर्दभ??"

यावर 'गाढव' किंवा 'मुंगी' यापैकी एका जन्मात आपण जाणार याच उदयला न्यात झालं.

यमाचा आवाज>> "एकंदरीत उदयने केलेल्या कर्मांवरून त्याच्या बुद्धी विषयीची शंका माझ्या मनात नाही, त्यामुळे या दोन्ही जन्मात त्याला कष्ट आणि धावपळ करावीच लागणार असून 'पिपीलिका' हा उदयचा पुढचा जन्म असेल हे मी जाहीर करतो." असं म्हणून यमाची पाठमोरी आकृती उदयला दिसली.


सो, फायनली उदय मुंगीच्या जन्मात जाणार होता आणि त्या प्रक्रियेला सुरुवात होणार होती. या प्रक्रियेचाच एक भाग म्हणजे पूर्वीच्या जन्माची आणि 'होल्टस्टेशन' वरील स्मुर्ती नाहीशा करणे. सो, स्मुर्ती नाहीशी करण्याची प्रक्रिया चालू असतानाच, तो प्रवेशद्वार जिथनं उदयने आत प्रवेश केला होता त्या प्रवेशद्वाराशी काहीतरी गदारोळ चाललाय अशी खबर चित्रगुप्ताकडे आली. तस समजताच चित्रगुप्त नक्की कसला गदारोळ आणि तो थांबवण्यासाठी त्या दिशेने निघून गेले. ते परतल्याननंतर उदयला समजलं कि कोणीतरी एक मोठा नेता तिथे आला असून (मृत्यूनंतर) तो अजूनसुद्धां इलेक्शनचा प्रचार करत होता. उदयला त्या नेत्याच्या Optimistपणाची कीव वाटत होती...

सो, सर्व प्रक्रिया पूर्णझाल्यावर आता उदय 'मुंगी' या त्याच्या नवीन जन्मात जाण्यास सज्य होता. अर्थात सद्यस्तिथीत तो बेशुद्ध अवस्थेत होता मात्र लवकरच त्याचा जन्म थेट मुंगीच्या घरात म्हणजेच कोणत्यातरी वारुळात होणार होता...!!


समाप्त

आभाळसांज


-मंगेश मिलिंद हरवंदे

Also Read "देव तारी त्याला कोण..?"


No comments:

Post a Comment